मित्रांनो..
प्रथमच ब्लॉगच्या विश्वात बोटं चालवत आहे. माझ्या मित्रांचे किशोर गांगुर्डे, आलोक जत्राटकर, संदीप तेंडोलकर यांचे ब्लॉग बघून वाचून वाटल आपणही आपला ब्लॉग तयार करावा. स्वताला व्यक्त करणारं हे चांगल माध्यमं आहे हेही जाणवलं. मुख्य म्हणजे लिखाणाचे सातत्य कायम रहावे यासाठी ही धडपड. आणि हो व्यंगचित्रांच्या माध्यमातून तुमच्याशी कनेक्ट राहण्याचाही हा एक प्रयत्न. चला तर मग ब्लॉगच्या माध्यमातून आपण एकमेकांशी कनेक्ट राहूया..